आपला जिल्हा

वीरशैव लिंगायत समाजातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची माहिती 

माजलगाव : सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाच्या वतीने यंदाही वीरशैव लिंगायत समाजातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी दिली.

लिंगैक्य श्री गुरु तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी कित्येक वर्षांपासून समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. यंदाही गुरुपौर्णिमेला या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका आणि आधारकार्ड सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाच्या व्यवस्थापनाकडे द्यावेत असे आवाहनही श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी केले आहे.

‘धार्मिकते बरोबरच मठाचे कार्य सामाजिक क्षेत्रातही अव्वल’

सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठ धार्मिक उपक्रमाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही भरिव कार्य करत आहे. समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून सदर शिष्यवृत्ती अखंडितपणे दिली जाते. आपण समाजाचे देणेकरी लागतो, या उदात्त भावनेने सदरील शिष्यवृत्ती योजना लोकोपयोगी ठरत आहे, अशी माहिती मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी दिली.

Comment here